खूप काही व्हायला खूप काही दिवस जायला लागतात असे काही नाही आहे ना ? म्हणजे काही काही वेळेला एकाच क्षणामध्ये मध्ये किती गोष्टी होऊन जातात .. ज्याचा आपल्याला पत्ता पण लागत नाही .. आणि जेव्हा त्या गोष्टी घडल्यामुळे झालेला परिणाम दिसायला लागतो आयुष्यामध्ये तसा खूप उशीर झालेला असतो.. म्हणजे तुम्ही मागे वळून बघू शकता पण फारसे काही बदल करू नाही शकत.. मुळात जे काही झाले ते तुमच्या चुकीमुळे झाले असे नसेल.. पण त्यावेळी एखादी बरोबर गोष्ट अचानक चुकीची वाटायला लागते.. माहित नाही का पण काय विचार केला होता आपण असा विचार करायला लागतो आपण .. आणि माहित नाही ते बरोबर आहे का चूक आहे कारण प्रत्येक विचाराच्या मागे त्यावेळची परिस्तिथी खूप प्रमाणात अवलंबून असते.. आणि चुका लक्षात आल्यावर मागे वळून बघण्यापेक्षा पुढे जाताना करायचे बदल विचारात घेतले पाहिजेत ना खरतर .. पण असे घडत नाही .. आपण त्यात अजूनच गुरफुटत जातो .. आणि अचानक एका संध्याकाळी लक्षात येते आयुष्य निघून गेले.. इतक्या गोष्टी ठरवल्या होत्या करायच्या .. काहीही पूर्ण करू नाही शकलो.. पण दुसर्याच्या चष्म्यातून बघताना गोष्टी खूप वेगळ्या दिसत असतात.. कदाचित.. वरवर आपण सुखी दिसणारी माणसे किती मनाने खचलो आहोत .. किती ओझ्यामध्ये राहत आहोत .. कशाचे भान नसते ना राहिलेले आपल्याला.. अन काय मिळवायचा आटापिटा करत असतो आपण आपल्याला तरी उमगलेले असते का ते कुणास ठाऊक.. आता माझ्या आयुष्यातला कितीतरी अश्या गोष्टी आहेत ज्या मी का केल्या याची उत्तरे मागे वळून बघताना कधीही मला मिळत नाहीत अन लहान होतो वेडे होतो म्हणून काही गोष्टी सोडून देता येतात पण अखं आयुष्य आपण असे नाही जाऊ देऊ शकत.. अन असा विचार करता करता परत बरेच वर्षे उलटून जातात.. म्हणजे आपण जगायला कधी लागतो असे म्हणायचे..
म्हणजे नेहमीच सगळ्यांना असे वाटत असते कि आपण जसे जसे मोठे होवू तसे चांगले जीवन कसे जगावे कळत जाईल तर याच्या बरोबर उलटे होत जाते का ??? अजून काय होते.. म्हणजे तसे बघायला गेले तर मोठे झाल्यावर बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत.. पण जशी जशी मागच्या प्रश्न्याची उत्तरे मिळत जातात तसे तसे प्रश्न पण वाढतच जातात कि .. त्यांचा मेळ लावायचा असे ठरवले तर जीवन जगणे म्हणजे फक्त आपण अस्तित्वात असण्यासारखे आहे.. बाकी काही जगणे राहतच नाही ना मग ??? आणि खरच जीवनात आयुष्य शोधायचे असेल तर प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत का ? आहेत ते आयुष्य प्रश्नांना सोडून जगले पाहिजे.. आणि खरच असे जगता येते का? प्रश्न समस्या यांना जर आयुष्यात स्थान दिलेच नाही तर जीवनामध्ये आयुष्य राहील का ? म्हणजे जर प्रश्न, प्रोब्लेम सगळे हातात हात घालून चालत असतील तर त्यातच आपण आयुष्य का नाही शोधात.. पण इतके लांब का पाळतो त्यापासून.. आणि त्यातल्या कितीतरी गोष्टी आपल्याला नेहमीच हव्या असतात पण मिळाल्या कि त्या का आपल्या नाही राहत? म्हणजे ते काहीतरी दुसर्याचे स्वप्न पूर्ण केल्या सारखे का वाटत राहते.. आणि माझे मलाच प्रश्न पडायला लागतात कि हेच स्वप्न मी पहिले होते का ? आणि पहिले असले तर ते आता पूर्ण झाले आहे मग आता काय करायचे ? नेहमी माणसाने स्वप्न पाहिली पाहिजेत न .. तसे असेल तर मग मला माझ्या पुढच्या आयुष्यातली स्वप्न का नाही हात धुवून मागे लागून पूर्ण करायची आहेत.. असे का आहे ?
काही काही गोष्टी कळणे म्हणजे खूप अवघड असते तसेच काही गोष्टी समजल्या पाहिजेत असा अट्टाहासच असायची गरज नाहीय पण काही काही गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत.. तुम्ही तुमच्या आयुष्याचे काय करायला चालला आहात? किंवा त्यामध्ये काय जगत आहात .. ? हा पण विचार असला पाहिजे... असे नाही आहे कसे जगले पाहिजे हा विचार करता करताच आयुष्य संपून गेले पण .. तरीही .. काहीतरी असले पाहिजे आयुष्यामध्ये ज्याच्या मागे तुम्ही मनापासून लागला आहात.. आणि ते स्वप्नपूर्ती चा ध्यास तुम्ही घेऊन जगत आहात..
प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असल्या तरी आपण एकाच बाजूचा नेहमी विचार करतो न .. ? मग तसेच काहीसे आहे प्रत्येक गोष्टीचे.. तुम्हाला हवी ती बाजू तुम्ही बघू शकता.. त्यातून पुढे जाऊ शकता.. आणि जी बाजू धरून आपण चाललो आहोत तेच मिळवणे अतिंम सत्य असेल तर .. त्याचा आनंद नक्कीच मिळत राहील आयुष्यात .. पण जर अतिंम ध्येय काय आहे हेच कळायला आयुष्य निघून गेले तर तो माणूस जगलाच नाही म्हणायचे का ? प्रत्येक गोष्टीच्या वेगवेगळ्या बाजू आहेत.. आणि त्याचा विचार करण्यापेक्षा.. आपण आयुष्य ठरवलेले जास्त चांगले नाही आहे का ?
No comments:
Post a Comment