Saturday, April 9, 2011

गाण्याचे शब्द

कधी कधी प्रत्येक गाण्याला आपला असा स्वतः चा काही अर्थ असतो.. अन तो अर्थ त्या गाण्याला असेल असे नाही.. कदाचित गाण्याचे शब्द काहीतरी वेगळेच म्हणणारे असतील पण ते गाणे ज्या काही आठवणी घेऊन येतात किंवा आपल्या साठी अर्थ बनून राहिलेले असते ते खूप काही वेगळे असते .. तसेच गाणे लिहिताना कवीला उमगलेला त्या कवितेचा अर्थ खूप काही वेगळा असेल, कवितेचे गाणे होताना किंवा करताना संगीतकाराला उमगलेले गाणे वेगळेच.. आणि कवितेवरून गाणे झाल्यावर त्याच्या जन्मदात्याला वाटणाऱ्या भावना खूप वेगळ्या असतील.. तसेच गाणे ऐकणारी हजारो लोक त्यांनी किती वेगळे अर्थ काढले असतील एकाच गाण्याचे.. अन मग लक्षात येते कि एकाच गाण्याला, त्याच सारख्या शब्दाला इतके अर्थ कुठून आले तर ते लक्ष कानांनी दिलेले किंवा उमगलेले अर्थ आहेत.. आता "कभी कभी" गाणे लिहिताना गुलझार नक्की कशाचा विचार करत बसले होते.. त्यांना कसे सुचले ते गाणे.. तेच गाणे म्हणताना, त्याच्यामध्ये अभिनय करताना अमिताभ ला काय उमगले असेल .. आणि तसेच आता ते गाणे ऐकताना मला वाटणारे त्याचे अर्थ किती वेगळे असतील , आहेत...
गाण्याचे अर्थ एकदाच डोक्यात बसतात असे काही नाही.. परिस्थितीवर पण त्यांचे अर्थ बदलत राहतात ..
अश्या बर्याच गोष्टी असतात ज्या नेहमी आपल्या भोवती होत असतात पण कधी त्याची जाणीव झालेली नसती किंवा आपण इतके कधी लक्ष्य दिलेले नसते त्या गोष्टींकडे.. नेहमी जाणार्या बस मध्ये दिसणारी माणसे..आपण म्हणतो कि प्रत्येक माणूस वेगळा पण हि सगळी सृष्टी कुठल्या धाग्याने बांधली गेली आहे.. प्रत्येक गोष्टी मध्ये काही साम्य आहे, ते साम्य कशातही असू शकते.. अगदी वेगळेपण असण्यामध्ये पण साम्य असू शकते.. पण ते साम्य शोधून काढायचे असते का असेच आपल्या समझून जाते .. कधी कळते आपल्याला या सगळ्या गोष्टी ? गाणे एक असताना त्याचे असंख्य अर्थ निघतात .. अन कदाचित अनेक गाणी एकच अर्थ सांगतात..
मुळात नातं गाण्याशी नसतेच ते प्रसंगांशी असते .... आता ''आयुष्यावर बोलू काही '' ऐकताना विश्वास पाटीलांची '' पानिपत '' आठवतं याला काय अर्थ आहे ? भिडलं ते पानिपत मग वाचताना कानी पडलेल्या सुरांनी शब्द साठवले ते इतिहासाचे.. आपली गाण्यांची साठवण अशीच प्रासंगिक असावी ... गाणंच काय पण आपण जपत वा मिरवत असलेलं प्रत्येक नातं त्या वस्तु ,वास्तू ,व्यक्ती ,वेस या विविधतेपेक्षा घटनांशीच असतं म्हणजे पर्यायाने स्वतःशीच ...! अंतर्मनात कुठला सूर कुठल्या नावाने उमटलाय काय सांगावं? माणसं वेगळी असतात ते खंर पण ती एकानावाने माणूस म्हणूनच ओळखली जातात हे महत्वाचं ... गुण, अवगुण सारे सारखेच ...सूर सारखे ..इतिहास सारखा ... पुराणिक बुवा पुराण सांगत राहतो ,,कोणाला राम पावेल कोणाला सीता ..! कोणाला गीता एकू येईल ,कोणाला तापा ,बाण , किंकाळ्या ...कोणाला मयसभा मानवेल कोणाला इंद्रप्रस्थ ...! वेगळेपण स्वागतार्हच पण त्यात खरेपण मात्र सारखं असलं पाहिजे ...म्हणजे मुखवटे गळून पडतील नि निरनिराळ्या भाव -सुरांची असेनात का पण गाणी सुरेल होतील .. मला गाणी आवडतातच ,शब्द भावातातच ,सूर भिडतातच , या गाण्याच्या पार्श्वभूमीवरच मी आठवणी साठवते ..गाणी नसती तर माझा पावसावर आणि भाउकतेवर विश्वास बसला असता ?

with thanks from Mrudgandha

3 comments:

  1. Kabhi-Kabhi by Gulzar

    nakki koNtya gaaNyavishayi bolata aahaat
    Kabhi-Kabhi by Sahir mala maaheet aahe.

    ReplyDelete
  2. खरं आहे, माझ्या पेना. :)


    अनंत ढवळेंचा एक शेर आहे-

    "काय या गावात आहे आपले?
    पाय का मागे वळावे सारखे??"

    हा शेर वाचतांना मला नेहमी पुणे आठवायचे. मी गृहीतच धरले होते की त्यांनी हा शेर पुण्याबद्दल लिहिला आहे. एकदा त्यांना प्रत्यक्ष भेटलो, तर ते म्हटले औरंगाबाद !
    मला विचित्र वाटलेले त्यावेळी... :)

    ReplyDelete
  3. aapaN dhanya aahaat, analogy waachoon vaaTale ki aata heart-attack yeto ki kaay!

    ReplyDelete