माणसाची माणसे असतात कि माणसांचा माणूस असतो .. ??? कधी कधी विचार करायला गेलो तर आपण किती एकटे असतो या जगात.. कधी विचाराने, कधी माणसांमध्ये, कधी माणसामुळे, कधी घटनांमुळे अशी बरीच कारणे असतात ... त्या एकटेपणा मागे.. पण प्रत्येक वेळी आपण त्यातून परत यायचा प्रयत्न करत असतो .. आपल्याला एकटे राहायचे नसते.. किंवा एकटे राहणे वाईट गोष्ट आहे हे कोणी ठरवले असेल .. ??? आपण आपल्याला शोधणे इतके का वाईट असते का ?? कितीतरी प्रश्न पडतात.. खरच एकटे असताना माणसाला त्याच्याच विषयी किती नवीन गोष्टी सापडतात .. कितीतरी गोष्टी आपण कुठेतरी लपवून ठेवलेल्या असतात . कितीतरी माहित नसतात .. माणसात राहणारा आणि माणसांविषयी विचार करून एकटा राहणारा पण किती वेगळी व्यक्तिमत्वे आहेत ना ? माणसांमध्ये राहणारा माणूस माणसांचा होतो आणि एकटा राहणार्या माणसाची माणसे असतात असे म्हणता येईल का ? मोठी मोठी लोक माणसांचा माणूस असतात असे म्हटले तर गल्लीतला एकटा राहणारा म्हातारा सुध्दा गल्लीचा असतोच कि .. अगदी सगळ्यांचा .. कशावरून ठरते तुम्ही माणसांचे आहात का माणसे तुमची आहेत.. का प्रत्येक माणसामध्ये दोन्ही बाजू असतात .. कुठेतरी ... फक्त कधी कुठली डोक बाहेर काढते तर कधी कुठली . ? आपण समाजात राहताना इतका माणसांचा विचार करतो .. पण दुसरे ज्यावेळी सेम विचार करत असतात त्यावेळी आपण त्याच्यासाठी समाजातला भाग झालेलो असतो .. म्हणजे आपण दोन्ही भागात असतो .. माणूस बदलला कि .. विचार बदलला.. !
नेहमी आपल्याला चांगली बाजू दाखवून लोकांच्या नजरेत मोठे व्हायचे असते.. त्याची ओढ कुठेतरी "माणसांचा माणूस" होण्याचा प्रयत्न तर नसावा .. त्याला प्रत्येकाची अनुमती हवी असते .. किंवा त्याची असणारी माणसे काय विचार करतात हे त्याला कुठेतरी खूप जास्त महत्वाचे असते .. म्हणजे "माणसाची माणसे" खूप आधी येतात आयुष्यात .. पण माणसांचा माणूस होणे म्हणजे बर्याच गोष्टी आल्या. अन सगळ्यात महत्वाचे म्हणजे मोठे होणे आले . चुका करायचा अधिकार नाही कारण लक्ष नेत्रांचा पहारा आहे .. असे काहीतरी होऊन जाईल का ? समाज आपल्याला घडवतो तसेच आपण समाज घडवत असतो ... त्याचा भाग बनून .. त्यामुळे आपण नेहमीच दोन्ही बाजूला असणार आहे .. या सगळ्या गोष्टी कधीच जाणवल्या नसतात .. लहान असताना अचानक आपण मोठे होतो.. सगळ्यांचा नजरा निरखून आपल्याकडे बघत असतात .. पहिले थोडे घाबरत, नंतर थोडे सावरत आपण कसे या समाजाचे दोन्ही बाजू बनून जातो कळत पण नाही .. अश्यावेळी दुःख करावे कि आनंद साजरा करावा हाच मोठा प्रश्न होऊन बसतो ... हे मात्र खर .. !
No comments:
Post a Comment